पाकिस्तानातील तक्षशिलापासून काही मैलांच्या अंतरावर असलेल्या भामळा गावाजवळ खानपूर तलावाच्या पाण्याच्या वरच्याबाजूला एक ऐतिहासिक बौद्ध शिल्प सापडले आहे. हे बौद्ध शिल्प गांधार शिल्पकलेचे उत्कृष्ट नमुना असल्याचे दिसते. भामळा येथील पुरातन स्थळी एक स्तूप सुद्धा आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांना सुरुवातीला या ठिकाणी काही अवशेष मिळाले होते. या ठिकाणी उत्खनन केल्यानंतर बुद्धांच्या शिल्पांचा शोध लागला आहे. तसेच याठिकाणी एक […]
Month: February 2020
पेशावर मधील बोधीवृक्ष; सम्राट कनिष्कने रुजविलेला बोधिवृक्ष अद्याप तग धरून
पाकिस्तानमध्ये पेशावर हे मोठे शहर आहे. या शहराचे पूर्वीचे नाव पुष्पापूर/पुरुषपूर होते. चिनी प्रवासी भिक्खूं फाहियान(३ रे शतक) आणि हुएनत्संग (७वे शतक)यांनी जेव्हा पेशावरला भेट दिली तेव्हाचा प्रवास वृत्तांत लिहून ठेवला आहे. सम्राट कनिष्क राजाच्या काळापासून पेशावर हे मध्य आशिया आणि दक्षिण आशिया भागाचे व्यापारी, राजकीय आणि धार्मिक केंद्र होते. इथूनच बौद्ध धर्माची महायान शाखा […]
माणूस मोठा नसला तरी बाबासाहेबांच्या विचारांनी त्याचे मन मोठे
हातात काठी. डोक्यावर लाल पगडी. फाटलेले जोडे, मळकट सदरा नि त्याहून मळकट धोतर! दीक्षाभूमीवर थांबलेल्या लोकांची आस्थेने विचारपूस करून बुद्ध व्हा, शुद्ध व्हा! असे बाबासाहेबांचे विचार सांगणारा ६१ वर्षीय वृद्ध. वयाने थकलेला; मात्र मनाने अजूनही तरुण असलेल्या वृद्धाचा हा प्रवास २५ वर्षांपासूनचा आहे. सयाजी गायकवाड त्या व्यक्तीचे नाव. लातूर जिल्ह्यातील निलंगा या गावातून ते आले […]
महाराष्ट्राची पहिली धम्मयात्रा- १९६० मधील सोपारा स्तुप यात्रा
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुयायांसह बौद्ध धर्माची दिक्षा घेतली आणि भारतातील असंख्य पिडीतांची आयडेंटिटी चेंज झाली. त्यांच्या आयुष्यातील नव्या मार्गावरील वाटचालीला सुरवात झाली. हा बदल अपेक्षित होताच आणि तो उस्फूर्तपणे स्वीकारला जाऊन घरातील काल्पनिक देवांना विसर्जित करण्यात आले. परंतु त्यावेळी तळागाळात बुद्धधम्माबद्दल काहीच माहिती नव्हती. वंदना माहीत नव्हती. मात्र धर्मांतर झाल्यानंतर […]
२३०० वर्षे जुनी अतिभव्य बुद्धलेणी – थोटलाकोंडा, विसाखापट्टनम – प्रा.हरी नरके
देशातील प्रमुख आणि प्राचीन बुद्धलेणी म्हणून आंध्रप्रदेशातील थोटलाकोंडा, विसाखापट्टणम महत्वाचे आहे. ते विसाखापट्टणमपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे. भीमूनिपट्टनम जवळच्या टेकडीवर हे लेणे आहे. थोटलकोंडा हे नालंदासारखेच एक प्राचीन बौद्ध विद्यापीठ होते. ते श्रीलंका आणि आग्नेय आशियातील विविध देशांमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार, प्रसार करण्याचे केंद्र होते. या पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर अशी दहा ज्ञानकेंद्रे […]
“शाल्भञ्जिका शिल्प” नेमके कोणाचे?
भारतीय शिल्पकलेमध्ये अनेक उत्तमोत्तम शिल्प आपल्याला पाहायला मिळतात. या शिल्पांचा अभ्यास जसा उत्साहपूर्ण असतो तसाच या शिल्पांचा इतिहासही रोचक असतो. भारतात शिल्पकलेचा जन्म हा बौद्ध संस्कृतीतून झाला हे निर्विवाद सत्य होय. बुद्ध लेणीं आणि त्यानंतरच्या अनेक स्थापत्यात भ. बुद्धांचा इतिहास किंवा त्यांच्या विचारांचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. “शालभंजिका” हे असेच एक शिल्प होय. हे शिल्प […]
बौद्ध संस्कृतीचा शब्द ‘पल्ली’
‘पल्ली’ म्हटल्यावर हा एक दक्षिण भारतीय शब्द आहे हे लक्षात येते आणि ते बरोबरच आहे. पण हाच शब्द आशिया आणि इतर खंडात सुद्धा पहायला व ऐकायला मिळतो याचे आश्चर्य वाटते. अशा या ‘पल्ली’ शब्दाचा उगम शोधला तर तो बौद्ध संस्कृतीतून आल्याचे स्पष्ट होते. नऊशे वर्षापूर्वी दक्षिण भारतात बौद्ध संस्कृती व बुद्धांची शिकवण जोपासणारी अनेक केंद्रे […]
सम्राट कनिष्काच्या काळातील ‘हा’ स्तूप पंजाबमधील बुद्ध धम्माची साक्ष देतो
पंजाबच्या फतेहगड साहिब जवळ संघोल एक छोटे गाव आहे. चंदीगड पासून ४० किमी अंतरावरील लुधियाना कडे जाणाऱ्या मार्गावर आणि ढोलेवाड या गावापासून १० किमी आत २०० किलोमीटर परिघात पसरलेल्या जागेला स्थानिक लोक उचा पिंड (उंच गाव) असेही म्हणतात कारण ते टेकडीवर आहे. संघोल गावात १९६८ साली पुरातत्व खात्याच्या उत्खनात सम्राट कनिष्काचा स्तूप आणि मध्य आशियातील […]
धम्म धारण करणे म्हणजेच बुद्ध उपदेशांना प्रज्ञेने पारखणे
मज्झिम निकाय या त्रिपिटकातील ग्रंथातील वत्थ सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी उपदेश केला आहे की जर एखादे मळलेले, डागाळलेले वस्त्र असेल आणि रंगाऱ्याने त्याला घेऊन कोणत्याही रंगात ते बुडविले तरीही त्याच्यावर चांगला रंग चढणार नाही. ते डागाळलेलेच राहील. कारण काय तर वस्त्र मलिन असल्याकारणाने त्यावरती पाहिजे तो रंग चढणार नाही. त्याचप्रमाणे चित्त जर विकारांने मलिन असल्यास त्याच्यावर […]
दलित हिंदू नाही म्हणत ‘या’ अस्पृश्य नेत्याने १८९८ साली धर्मांतर करून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती
तामिळनाडूतील अस्पृश्य (पारियार) समाजातील अयोथीदासार (आययोथी थास, अयोध्यादास) यांनी १८९८ साली बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन तामिळ मधील (वैदिक) धर्मांध लोकांना हादरा दिला होता. बौद्ध धम्मच आपला मूळ धर्म आहे, असा युक्तिवाद करून त्यांनी पारियार या अस्पृश्य जातीतील लोकांना बुद्ध धम्म स्वीकारण्यास सांगितले होते. अयोथीदासार यांनी फक्त धर्मांतरच केले नाहीतर मद्रास जवळ पेरंबुर येथे साऊथ इंडिया […]