पाकिस्तान-व्याप्त काश्मीर (पीओके) परिसरातील गिलगिट बाल्टिस्तान येथील पुरातन खडकावरील कोरीव केलेल्या बौद्ध प्रतिकांची तोडफोड करण्यात आली आहे. भारताने या प्रकरणी तीव्र निषेध केला तसेच पाकिस्तानला कडक शब्दात सुनावले. आमच्या भूभागात पाकिस्तानकडून सुरू असलेले हे कृत्य खपवून घेणार नाही. पाकिस्तानने हा भूभाग ताबडतोब रिक्त करुन इथून कायमचे चालते व्हावे, असे भारताने सुनावले. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध केला.
गिलगिट बाल्टिस्तान येथे बौद्ध संस्कृतीची प्रतिके काही दगडांवर कोरण्यात आली आहे. हे कोरीव काम इसवी सन ८००च्या सुमारास करण्यात आले आहे. हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करणे आवश्यक आहे. पण त्या ठिकाणी मुद्दाम तोडफोड आणि इस्लाम धर्माशी संबंधित मजकूर रंगवून पाकिस्तानने वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न चालवला आहे.
बौद्ध चिन्हे नष्ट केली जात आहेत
केंद्रीय मंत्री अनुराग श्रीवास्तव म्हणाले की, पाकिस्तानने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेल्या “गिलगिट-बाल्टिस्तान” मध्ये असलेल्या अमूल्य भारतीय बौद्ध वारशाची तोडफोड आणि नष्ट केल्याबद्दल आम्ही तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
ते म्हणाले की बौद्ध चिन्हे नष्ट केली जात आहेत आणि पाकिस्तानच्या अवैध व्यापाराखाली भारतीय प्रदेशात धार्मिक आणि सांस्कृतिक हक्क आणि स्वातंत्र्याची छेडछाड केली जात आहे ही गंभीर चिंताजनक बाब आहे.
पाकिस्तानला अन्य धर्मियांच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार नाही. त्यांनी या भूभागावरील त्यांचा बेकायदा ताबा सोडून द्यावा. तज्ज्ञच त्या ठिकाणी जाऊन या वारशाची डागडुजी करू शकतील आणि भारत या वारशाचे जतन करेल, असेही श्रीवास्तव म्हणाले.
प्राचीन खडकावर बनविलेले पाकिस्तान ध्वज:
यापूर्वी असे काही अहवाल आले आहेत ज्यात असा दावा केला गेला आहे की, पीओकेमधील कट्टरपंथीयांनी प्राचीन खडकावर कोरण्यात आलेल्या बौद्ध शिल्पांची तोडफोड केली आणि त्यांनी पुरातन खडकावर पाकिस्तानचा झेंडा बनवला आणि अनेक घोषणा लिहिल्या आहेत.
Have such slogans and paintings been made on the Gandhara civilization which is located in the Punjab province of Pakistan from the last three thousand years before Christ or is it just to militarize the civilizations of the disputed region of Gilgit-Baltistan ??? @pid_gov pic.twitter.com/SgiqJNfo0z
— Araib Ali Baig (@The_North_Blood) May 25, 2020
अशाच प्रकारे 2001 मध्ये अफगाणिस्तानात तालिबान्यांनीही क्रूरता केली होती. त्यांनी बामियान बुद्धाच्या प्राचीन पुतळ्यांनास्फोटकांद्वारे तोडफोड करून नष्ट केले, त्यांच्या ह्या कृत्याचा जगभर विरोध करण्यात आला होता.
गिलगिट बाल्टिस्तानचा इतिहास
जम्मू-काश्मीर संस्थान भारतात विलीन झाले त्यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तान पुरस्कृत टोळीवाले आणि पाकिस्तानचे सैनिक यांनी मोठ्या संख्येने घुसखोरी केली होती. या घुसखोरांना पिटाळण्याची प्रक्रिया जोरात सुरू होती. जम्मू-काश्मीरमधील काही जिल्ह्यांमधून घुसखोरांना पिटाळण्यात आले होते. मात्र गिलगिट बाल्टिस्तान येथील घुसखोरांना पिटाळून लावण्याआधीच पंतप्रधान नेहरू यांनी एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली.
युद्धबंदीच्या घोषणेचा निर्णय त्यांनी एकट्याने घेतला होता की, त्यावेळचे भारत आणि पाकिस्तानचे व्हाईसरॉय माऊंटबॅटन यांच्याकडून दबाव आला होता हे रहस्यच राहिले. पण हा निर्णय झाल्यामुळे गिलगिट बाल्टिस्तान हा जम्मू-काश्मीर संस्थानचा भूभाग पाकिस्तानच्या ताब्यात राहिला. याच भागाला भारत सरकार पाकिस्तान व्याप्त काश्मीर अर्थात POK म्हणते.
आंतरराष्ट्रीय राजकारणाचे भान, लष्कराची मर्यादा किंवा अन्य अज्ञात कारणांमुळे असेल पण गिलगिट बाल्टिस्तान हा भारताचा भूभाग असला तरी भारताने अद्याप ताब्यात घेतलेला नाही. मात्र केंद्रातले मोदी सरकार लष्करी कारवाई करुन हा भूभाग ताब्यात घेण्याची शक्यता वाटू लागल्यापासून पाकिस्तानमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.
भारताच्या हवामान खात्याने गिलगिट-बाल्टिस्तानमधील हवामानाचे अंदाज वर्तविण्यास सुरुवात केल्यापासून ही अस्वस्थता आणखी वाढली आहे. याच अस्वस्थतेतून बौद्ध धर्मियांच्या प्रतिकांची विटंबना करण्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे.